शिक्षण फक्त शाळेत आणि पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून होतं या समजाला मोडीत काढणारा एक उपक्रम ‘जागृत महिला समाज’ या बल्लारपूरच्या संस्थेनं घेतला. कळमना गावातल्या शालेय मुलांबरोबर त्यांनी गावाचा अभ्यास केला. त्यातून तयार झाली एक सुंदर पुस्तिका. आपल्या गावातली शेती, जंगल, पाणी, जमीन, व्यवसाय याबद्दल विस्तृत आणि नेटका अभ्यास करून त्यांनी गावात कोणती आणि किती नैसर्गिक संसाधनं आहेत, त्यात काय फरक होत चाललाय. सगळे पुढे आणले आहे. हीच पुस्तिका मुखपृष्ठावर दिसते आहे. लेख - पान ४ वर